काँग्रेसलाही भवितव्य नाही   

चिदंबरम यांच्यावर भाजपची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली होती. त्यावर काँग्रेसलाच कोणतेही भवितव्य नाही, अशी टीका भाजपने शुक्रवारी केली आहे. 
 
 भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी याबाबतची टीका केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय चिदंबरम यांना चांगले माहित आहे की, काँग्रेसला भवितव्य नाही. भाटिया म्हणाले, इंडिया आघाडीची स्थापनाच केवळ केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी झाली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्यावर टीका करुन नेत्यांनी एक प्रकारे देशविरोधी आघाडीच स्थापन केल्याची प्रतिमा जनतेत निर्माण झाली.. त्यामुळे आघाडीला मतदारांनी झिडकारले. कारण सर्व नेते मंडळी नागरिकांपेक्षा स्वत:चे हित पाहात होते, असा आरोपही त्यांनी केला. आता चिदंबरम म्हणत आहेत की इंडिया आघाडीचा मृत्यू झाला आहे. भाजपचे अन्य प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, चिदंबरम यांनी चिंता व्यक्त करुन भाकित केले आहे की, विरोधकांची इंडिया आघाडी एकसंघ नाही. 
 

Related Articles